Uddhav Thackeray| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील होऊ घातलेले तिसरे सरकार बहुमतापासून दूर राहिल्याचे दिसून येत आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणूक निकालांच्या विपरित यंदाचे निकाल आले आहेत. यावेळी भाजपाला 272 चा जादूई गटाचा आकडा गाठता आलेला नाही. सत्ताधारी एनडीएला 296 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीला जवळपास 230 जागांवर आघाडी मिळाली.
एकट्या भाजपाने बहुमत मिळवलेलं नसून त्यांना सत्तास्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. अशातच इंडिया आघाडीनेही 230 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे इंडिया आघाडी देखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “इंडिया आघाडीने देशात सत्तास्थापनेचा दावा केला पाहिजे. इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. मी दुपारनंतर त्या बैठकीला जाणार आहे. मी संध्याकाळी इंडियाच्या बैठकीत जाऊन या विषयावर बोलेन. हे जुलूम करणारे सरकार उंबरठ्यावर असून त्यांना आपण हटवले पाहिजे. या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होते की, देशातील सर्वसामान्य जनतेने त्यांची ताकद दाखवून दिली आहे. त्याबद्दल मी देशातील जनतेचे अभिनंदन करतो.”
पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार?
यावेळी उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार असेल तर तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या बैठीकीत आम्ही त्यावर चर्चा करू. आम्ही आघाडी तयार केली तेव्हा आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल याबाबत ठरले नव्हते. आमच्यापैकी कोणताही नेता सत्तेसाठी आघाडीत आला नव्हता. देशाचं संविधान वाचवणे, हुकूमशाहाला रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.” Uddhav Thackeray|
दरम्यान, देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 294 जागा तर इंडिया आघाडीला 230 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना 17 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला जनतेने साथ दिल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांपैकी, महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजप 9, शिंदे गट 7, अजित पवार गट 1, ठाकरे गट 9, शरद पवार गट 8, काॅंग्रेस 13 तर इतर 1 अशा जागा मिळाल्या आहेत. Uddhav Thackeray|
हेही वाचा:
पंकजा मुंडे, रावसाहेब दानवेसह महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांचा झाला पराभव