मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रियासुद्धा राजकीय पक्षांनी चालू केली होती. आता निवडणूक आयोगाकडून याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 14 जागा रिक्त असून त्यापैकी 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या 11 जागांपैकी आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा मिळण्याची शक्यात आहे. या 2 जागांसाठी अजित पवार गटाकडून तिघांची नावे चर्चेत आहेत.
या तिघांची नावे चर्चेत
इच्छुक उमेदवारांमध्ये जी महत्त्वाची नावे आहेत, त्यात राजेश विटेकर, सुरेखा ठाकरे आणि संजय दौंड यांचा समावेश आहे. मात्र या तिघांमधील कोणत्या दोन नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
तिन्ही इच्छुक उमेदवारांचा थोडक्यात परिचय
परभणीची लोकसभेची जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडताना त्या ठिकाणाहून इच्छुक विटेकर यांना विधान परिषदेवर घेण्याचं आश्वसन अजित पवार यांच्याकडून देण्यात आले होते.
बीड जिल्ह्यातील काम पाहता संजय दौंड यांनीदेखील विधानपरिषदेसाठी आग्रह धरला आहे.
तर सुरेखा ठाकरे यांनी आपण पक्ष संघटनेत सुरुवातीपासून काम करत असल्याने विधान परिषदेची मागणी केली आहे.