श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर येथे निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी व पायी दिंडी सोहळ्याचे आमदार लहु कानडे यांच्यावतीने श्रीरामपूर नगरीत स्वागत करण्यात आले. शहरातील संगमनेर नाक्यावर मान्यवरांनी पालखीतील निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून मोहन महाराज बेलापूरकर व दिंडीप्रमुख कांचनबाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालखी व दिंडी पंढरपूरला निघाली आहे. या दिंडी व पालखीचे बाभळेश्वरमार्गे आज दुपारी श्रीरामपूर येथे आगमन झाले.
आ. कानडे विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे मुंबईत असल्याने दिंडीचे संगमनेर नाक्यावर त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले. यावेळी दिंडीतील निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करून आमदार कानडे समर्थक कार्यकर्त्यांनी पालखीचे दर्शन घेतले.
यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे,
प्रा. कार्लस साठे, रमेश कोठारी, राजेंद्र कोकणे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, नगरसेवक राजेश अलघ, कलीम कुरेशी, भैय्या शाह, गणेश कांबळे, मदन हडके, दीपक कदम, रमेश आव्हाड, निखिल कांबळे, आशिष शिंदे, कल्पेश माने, किशोर कांबळे आदिंसह कार्यकर्त्यांनी पालखीचे दर्शन घेऊन भाविकांचे स्वागत केले.