Vijay Wadettiwar| लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज 1 जून रोजी पार पडत आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान आज होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. ज्या जागांवर आज मतदान होत आहे त्यामध्ये पंजाब आणि यूपीमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमधील 9 जागा, बिहारमधील 8 जागा, ओडिशातील 6 जागा, हिमाचल प्रदेशातील 4 जागा, झारखंडमधील 3 जागा आणि चंदीगडमध्ये एक जागा आहे. त्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलचे निकाल समोर येतील.
मात्र मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार ? Vijay Wadettiwar|
“आम्ही आमच्या मतपेट्यांची सुरक्षितता कशी राहील याच्याकडे लक्ष देणार आहे. हायकमांडचे आदेश अंतिम आहेत. त्यांनी सांगितले जाऊ नका तर नाही जाणार,” असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी राज्यात इंडिया आघाडीचेच सरकार येणार,”असा विश्वासही व्यक्त केला.
पत्रकार परिषद : Press Conference pic.twitter.com/hRhvr6a9LK
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 1, 2024
यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळाबाबत भाष्य करत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयावह आहे. हसन मुश्रीफ अजूनही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागत आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी परवानगी का मागितली नाही. हे नियम शिथिल करण्यासाठी परवानगी मागत नाही तर टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. Vijay Wadettiwar|
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा काय म्हणाले?
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी “पक्षाने ४ जून रोजी प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्सिट पोलच्या कोणत्याही चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “मतदारांनी मतदान केले आहे आणि त्यांचा निर्णय सुरक्षित आहे. निकाल 4 जून रोजी येईल. त्याआधी आम्हाला टीआरपीसाठी अटकळ आणि वादविवाद करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नाही. एक्झिट पोल चर्चेत भाग घेणार नाही. आम्ही 4 जूनपासून होणाऱ्या चर्चेत आनंदाने सहभागी होऊ.” असे सांगितले होते.
त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत असल्याने एक्झिट पोलवर ते बहिष्कार टाकत असल्याचे म्हंटले. त्यावर वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा:
सातव्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 26 टक्के मतदान ; बिहार-ओडिशामध्ये संथगतीने मतदान