सोलापूर : संभाजी भिडे गुरूजींनी वटसावित्रीच्या पुजेवेळच्या महिलांच्या पेहरावावरून केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.यादरम्यान आता त्यांच्या या टिकेवरून सोलापुरातल्या महिला संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे?
भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये, हे आता जास्त होत असून आता ऐकवलं जातं नाही. आम्ही काय करायचं आणि काय करू नये हे सांगणारे भिडे गुरुजी हे कोण आहेत? ते आमचं घर चालवत नाहीत. यापुढे त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांचे पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्ही बोलू शकतो. त्यांनी वाढवलेल्या मिशाही आम्हाला कापाव्या लागतील.
संभाजी भिडे काय म्हणाले?
“वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी,ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनीच पूजेला जावं असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते.