PM Narendra Modi | 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी विरोधी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या संकुलात एकत्र येणार आहेत. त्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेनंतर नवनिर्वाचित खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संसदेत शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले.
यावेळी मोदी म्हणाले, “हा अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नवीन संसद भवनात होत आहे. या महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे, आम्हाला तिसऱ्यांदा जनतेने संधी दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे.”
#WATCH | PM Narendra Modi says, “…The 18th Lok Sabha is starting today. The world’s largest election was conducted in a very grand and glorious manner… This election has also become very important because for the second time after independence, the people of the country have… pic.twitter.com/bASHVtfh3S
— ANI (@ANI) June 24, 2024
18 अंकाचे सांगितले महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 अंकाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, “आपल्याकडे 18 पुराण आहेत. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. आता 18 वी लोकसभा आहे. 18 लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल. 18 ची मूळ संख्या 9 आहे आणि 9 पूर्णतेची हमी देते. आपल्याला वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो. 18वी लोकसभा भारतासाठी शुभ संकेत आहे.”
2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरूवात
पुढे ते म्हणाले, ‘सर्वोत्तम भारत’, ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प घेऊन आजपासून 18 वी लोकसभा सुरू होत आहे. संसदेची ही स्थापना भारतातील सामान्य माणसाच्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी आहे. नवीन उंची, नवा वेग आणि नवा उत्साह गाठण्याची ही संधी आहे. 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने आजपासून 18 वी लोकसभेला सुरुवात होत आहे.”
सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक, पण…
“देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला आहे. त्याचा अर्थ त्यांना सरकारची धोरणे आणि हेतू मान्य आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन देशसेवेसाठी एकमत निर्माण करण्याचा सदैव प्रयत्न करणार आहे”, असे मोदी म्हणाले.
आणीबाणी लागू केल्याचा उल्लेख
नरेंद्र मोदी यांनी 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केल्याचाही उल्लेख केला. “उद्या 25 जून आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी 25 जून हा दिवस अविस्मरणीय आहे. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासला गेला. भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली आणि देश तुरुंगात बदलला. आणीबाणीची 50 वर्षे म्हणजे 50 वर्षांपूर्वी जे केले होते ते पुन्हा कोणीही करू नये असा संकल्प आहे,” असेही मोदी म्हणाले.
विरोधकांवर साधला निशाणा
यावेळी मोदींनी देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. ते लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील आणि जनतेचे प्रश्न मांडतील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही म्हंटले.
हेही वाचा:
शेअर बाजाराची मंद सुरुवात ; सेन्सेक्स 77 हजारांच्या खाली तर निफ्टी 23400 च्या खाली घसरला