Raj Thackeray| आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थिती मनसेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्यात सध्या सुरू असलेल्या जातीय आरक्षणावरील वादावर भाष्य केले. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
“समाजाने ही गोष्ट ओळखली पाहिजे. मी अनेकदा माझ्या भाषणामधून मुलाखतीतून जातीपातीनं काहीही होणार नसल्याचे सांगितले. आता हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मतं घेतील आणि भोळसटपणे हे मतं देतील. पण याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या पिढ्यांवर होणार आहे. जातीपातीचं विष कालवणारी लोक आहेत. महाराष्ट्राने यांना दूर ठेवले पाहिजे, ” असे राज ठाकरे म्हणाले.
समाजानं हे वेळीच ओळखणं गरजेचं
“कितीही आवडता नेता किंवा आवडता पक्ष असला तरीसुद्धा असलं विष कालवणार असतील तर पुढच्या पिढ्यांचं कसे होणार? महाराष्ट्राचं काय होणार? विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातून हाताला मतं लागतायत, हे त्यांना कळालं आहे. त्यामुळे हे याच प्रकारे पुढे जाणार त्यामुळे समाजानं हे वेळीच ओळखणं गरजेचं आहे, मी नेहमी सांगत आलो, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी सुरू आहेत. तसं महाराष्ट्रात सुरू होईल, खून-खराबे सुरू होतील यावरुन रक्तपात होईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.
जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा सुरू करणार
महाराष्ट्र दौऱ्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केले. जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा सुरू होणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. तसेच आजची बैठक पक्षांतर्गत होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनच आजची पक्षांतर्गत बैठक होती. या बैठकीमध्ये नेते मंडळींना कामं दिलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बांबू बाबतच्या वक्तव्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही लोकांना बांबू लावण्याची गरज आहे, असं म्हणाले होते. यावर लावा म्हणावं, असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावला.
हेही वाचा:
“मोदी सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट” ; NEET पेपर लीक प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची टीका