पारनेर, (प्रतिनिधी) – भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी वाचला तर देश वाचेल. दिवसेंदिवस काही शेतकरी हा शेतीसाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतो. कर्जाची परतफेड न झाल्यास तो आत्महत्याला प्रवृत्त होतो, मात्र काही शेतकरी बॅंकेकडे येत नाहीत.
अशा परिस्थितीत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या जाणून घेणार असल्याचे प्रतिपादन नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या नूतन शाखाधिकारी शैला गायकवाड यांनी केले.
बॅंक ऑफ महाराष्ट्र नारायणगव्हाण शाखा अधिकारी म्हणून गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल खातेदारांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी पत्रकार विशाल फटांगडे, उद्योजक अमोल यादव, कॅशिअर मिलिंद वाढवणे, संकेत बेलसरे, सुरेश साळुंके, अविनाश औटी आदी उपस्थित होते.