सविंदणे, (वार्ताहर)- आमदाबाद (ता. शिरूर) येथील महादेव मंदिराजवळचे दोन विद्युत रोहित्र (दि.२६) जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नासधूस करुन फोडले आहेत. चार दिवसांपूर्वी एलसीबी व शिरूर पोलिसांनी रोहित्र चोरांना पकडले होते.
या चोरांना पकडल्यानंतरही चार दिवसांत सविंदणे येथील पडवळ यांचे एक रोहित्र, निमगाव दुडे येथील एक, आमदाबाद येथून दोन रोहीत्र चोरीला गेले आहे. चार दिवसांत चार रोहित्र चोरीला गेल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
आता अनेक विद्युत रोहित्र चोरीच्या टोळ्या सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. चोरांनी पोलिसांना खुले आव्हान दिले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात शेतकऱ्यांचा, महावितरणचा नाहक बळी जात आहे.
यावर जो उपाय व्हायला हवा. मात्र, त्याकडेच दुर्लक्ष होत आहे. चोर पकडले तरी ते पुन्हा नव्याने सक्रिय होतात. हे काही नवीन नाही. यावर तंत्रज्ञानाची बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.