T20 World Cup 2024 & Team India : भारतीय क्रिकेट संघाने बार्बाडोसच्या भूमीवर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. शनिवारी, 29 जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया भारतात परतणार होती, पण हरिकेन बेरील वादळाने संपूर्ण खेळ खराब केला आणि टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली. आता जो अहवाल समोर आला आहे त्यामध्ये सर्व भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ज्यामध्ये चॅम्पियन टीम इंडिया बार्बाडोस सोडून भारतात कधी पोहोचेल हे सांगण्यात आले आहे.
वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोमधून वेळेवर निघू शकला नव्हता. मात्र, सध्या तिथे वादळ पूर्णपणे थांबले आहे आणि बीसीसीआयने भारतीय संघाला तेथून बाहेर काढण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, टीम इंडिया बार्बाडोसच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता बीसीसीआयच्या विशेष विमानाने भारतासाठी रवाना होईल. पुढे, अहवालात असे सांगण्यात आले की चॅम्पियन टीम इंडिया बुधवारी संध्याकाळी 7.45 वाजता दिल्लीला पोहोचेल.
भारतीय टीम मंगलवार को शाम छह बजे बारबाडोस (लोकल समय) से दिल्ली के लिए चार्टर से रवाना होगी। बीसीसीआई ने विशेष चार्टर से उनके भारत पहुंचने की व्यवस्था की है। यहां अब तूफान थम गया है।
— Abhishek Tripathi / अभिषेक त्रिपाठी (@abhishereporter) July 2, 2024
दैनिक जागरणचे क्रीडा संपादक अभिषेक त्रिपाठी यांनी सुध्दा त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून याबाबत माहिती दिली आहे. पण, भारतीय संघ भारतात केव्हा परतणार किंवा केव्हा पोहचेल याबदल बीसीसीआय किंवा आयसीसीने त्याच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाउंट किंवा इतर सोशल माध्यमावर कोणतीही माहिती दिलेली नाही. याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासोबतच भारतात परतणार असल्याचे आश्वासन दिले होते. आता बीसीसीआयच्या सर्व प्रयत्नांनंतर टीम इंडियाची भारतात परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रोहित ब्रिगेडने बार्बाडोसमध्ये रचला आहे इतिहास…
भारतीय संघाने बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 2024 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाचा हा दुसरा टी-20 विश्वचषक होता. 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर भारताला या फॉरमॅटचे दुसरे जेतेपद पटकावण्यास 17 वर्षे लागली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषकाचे पहिले विजेतेपद पटकावले. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाला दुसरे विजेतेपद मिळाले आहे.