T20 World Cup 2024 Super 8 (IND vs AUS, Weather Pitch Report) : भारताचा सामना सोमवारी सेंट लुसिया येथे ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यातही भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवू इच्छितो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. रविवारी त्यांना अफगाणिस्तानकडून 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याचा त्यांचा मार्ग कठीण झाला आहे.
भारतीय संघ सध्या गट-1 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी सुपर-8 चे दोन्ही सामने जिंकले आहेत. सध्याच्या स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत भारताला आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला फायदा आणि कोणाचे नुकसान होणार , हे जाणून घेऊया…
हवामान अहवाल काय सांगतो?
टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोनच संघ आतापर्यंत अपराजित आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 31 पैकी 19 टी-20 सामने जिंकले आहेत. आता सोमवारी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना सेंट लुसिया येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. मात्र, हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. भारताचे आतापर्यंतचे सर्व सामने सकाळीच झालेले आहेत आणि कांगारूविरूध्दचा सामनाही सकाळी असेल. हवामान अहवालानुसार, सकाळी पावसाची 55 टक्के शक्यता असून तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे खेळ खराब होऊन सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्या फायदा कोणाला होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक गुण जमा होईल. भारतीय संघ सध्या ग्रुप-1 मध्ये चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारताचे पाच गुण होतील आणि संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात तीन गुण होतील. सुपर-8 मधील त्याचा हा शेवटचा सामना असेल. सामना रद्द होताच, अशा स्थितीत हा अफगाणिस्तानला बांगलादेशचा पराभव करून चार गुण आणि चांगल्या नेट रनरेटसह उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल.
खेळपट्टी कशी असेल?
सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी स्टेडियमवर आतापर्यंत 180 हून अधिक सामने खेळले गेले आहेत आणि बहुतांश सामन्यांमध्ये संघांकडून चांगली कामगिरी दिसून आली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध वेस्ट इंडिजने केलेली 218 धावसंख्या ही या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना या मैदानावर दुसऱ्या डावात 197 धावा झाल्या. अशा स्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना उच्च स्कोअरिंग होऊ शकतो.
टी-20 विश्वचषक 2024 साठी दोन्ही संघ…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.