T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Weather Update) : काही तासांत भारत आणि इंग्लंड यांच्यात 2024 टी-20 विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना सूरु होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. याआधी गयानामधून एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, हा व्हिडिओ भारतीय चाहत्यांसाठी भितीदायक नाही. वास्तविक, गयानामधील सामन्यापूर्वी मुसळधार पावसाचा व्हिडिओ समोर आला आहे. गयानामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे, मात्र सामन्यापूर्वी मुसळधार पावसाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Not so good at the moment 😞
Rained heavily when we were on our way and it’s drizzling now
But good news is , the. Sun is peeping out #IndvsEng #T20WorldCup #CricketTwitter pic.twitter.com/KMA50Y10ml
— DK (@DineshKarthik) June 27, 2024
रद्द होऊ शकतो उपांत्य फेरीचा सामना…
गयानामध्ये पावसाचे जे व्हिडिओ समोर येत आहेत आणि मैदानाची स्थिती पाहता भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो, असे दिसते. मात्र, आयसीसीच्या नियमानुसार पाऊस पडणे किंवा सामना रद्द होणे ही भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे.
The current condition of Guyana ground. [📸: Dinesh Karthik] pic.twitter.com/mex5Wm51Am
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2024
दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकनेही एक व्हिडीओ शेअर केला असून त्यानेही सध्या गयानामध्ये पाऊस असल्याचे सांगितले आहे. तसेच या व्हिडीओमध्ये मैदानावर पाणी साचलेले दिसत आहे. त्यामुळे सामन्यास विलंब होण्याची शक्यता दिसते.
Not so good at the moment 😞
Rained heavily when we were on our way and it’s drizzling now
But good news is , the. Sun is peeping out #IndvsEng #T20WorldCup #CricketTwitter pic.twitter.com/KMA50Y10ml
— DK (@DineshKarthik) June 27, 2024
सामना रद्द झाला तर…
गयानामध्ये आज पावसाची चांगली शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे संततधार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामनाही रद्द होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सामना सुरू होण्याच्या एक तास आधी पाऊस पडण्याची 40 टक्के शक्यता आहे. सामना सुरू होण्याच्या वेळी पावसाची 60 टक्के शक्यता आहे. जर हा सामना पावसामुळे वाहून गेला, तर आयसीसीच्या नियमांनुसार टीम इंडिया सुपर-8 मध्ये अव्वल राहिल्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करेल.
#WATCH | Rain lashes Guyana ahead of semi-final clash between India and England in T20 World Cup 2024 pic.twitter.com/roIl3RZcgZ
— ANI (@ANI) June 27, 2024
सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही
टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी राखीव दिवसाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आयसीसीने भारत-इंग्लंड सामन्यात 250 मिनिटांचा नियम जोडला होता. याचा अर्थ असा की जर पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला, तर दिलेल्या वेळेत 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडला जाईल. या नियमाचा अर्थ असा आहे की भारत-इंग्लंड सामन्यात षटकांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही आणि सामन्याची खेळण्याची वेळ रात्री 1:10 पर्यंत (भारतीय वेळेनुसार) वाढेल. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.