T20 World Cup 2024 (IND vs SA Final,Weather Update) : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन संघात रंगणार आहे. विजेतेपदाच्या सामन्याचा टाॅस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता तर रात्री आठ वाजता ब्रिजटाऊन (बार्बडोस, barbodos kensington oval) येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर सामना सुरू होणार आहे. या सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. तत्पूर्वी येथे सध्या हवामानाची काय स्थिती आहे हे जाणून घेऊया….
सध्या हवामानाबाबत चांगली बातमी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी बार्बाडोसमध्ये पाऊस पडत नाही आहे. मात्र, आकाशात काळे ढग आहेत. अंतिम सामन्याचा टाॅस वेळेवर होईल अशी आशा आहे. सोशल मीडियावर बार्बाडोसच्या हवामानाबाबत अनेक प्रकारचे अपडेट्स समोर येत आहेत. ताज्या माहितीनुसार, सध्या पाऊस पडत नसला तरी आकाश ढगाळ आहे.
वेस्ट इंडिजच्या हवामानाबद्दल काही सांगता येत नाही, इथे केव्हाही पाऊस सुरू होतो. मात्र, तरीही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेतेपदाचा सामना वेळेवर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज हा सुध्दा सध्या वेस्टइंडिज येथे सामना पाहण्यासाठी आणि समालोचन करण्यासाठी उपस्थित आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून 5.12 मिनिटांनी सद्याच्या हवामानाबाबत व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे.
दिनेश कार्तिकने म्हटले आहे की,काल पाऊस पडला. सध्या आत्तातरी हवामान स्वच्छ असून पाऊस पडत नाही आहे. असे सांगून त्याने खेळण्याच्या परिस्थितीसाठी योग्य हवामान असल्याचे म्हटले आहे.
It rained YESTERDAY
As of now, Weather looks SOLID
perfect weather for playing conditions #T20WorldCup #T20WorldCup2024 #INDvsSAFinal #CricketTwitter pic.twitter.com/U2UFm31r1t
— DK (@DineshKarthik) June 29, 2024
राखीव दिवशी सामना झाला नाही तर….
पावसामुळे जर सामन्यावर काहाही परिणाम झाला तर आयसीसीने 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवला आहे, जेणेकरून सामन्याचा निकाल 29 जूनलाच घोषित करता येईल. तरीही 29 जूनला निकाल लागला नाही तर घाबरण्याची गरज नाही. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. 29 जून रोजी पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे किमान दहा-दहा षटकांचा खेळ शक्य नसेल, तर सामना राखीव दिवशी म्हणजेच 30 जूनला होईल. राखीव दिवशी, सामना जिथे थांबला तिथून सुरू होईल. एकदा टाॅस झाला की सामना सूरू झाल्याचे मानला जाईल.
तसेच जर पावसामुळे राखीव दिवशीही सामना झाला नाही तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. दरम्यान, 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंकेचा संघ यांना संयुक्त विजेतेपद दिले गेले होते.