T20 World Cup 2024 (IND vs SA Final) : टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून भारताने दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला आहे. या सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, मात्र सामन्यानंतर झालेल्या बक्षीस समारंभात (Presentation Ceremony) कोहलीने हा आपला शेवटचा विश्वचषक असल्याचे जाहीर केले.
सामन्यानंतरच्या मुलाखतीत विराट कोहली म्हणाला की, “हा माझा शेवटचा विश्वचषक होता. विश्वचषक जिंकण हेच आमचे ध्येय होते. एके दिवशी तुम्हाला वाटते की तुम्ही धावा काढत नाही आणि मग असे काही घडते. देव जे काही करतो ते चांगलेच करतो. माझ्यासाठी ही ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी स्थिती होती. भारतासाठी माझा शेवटचा T20 सामना होता. आम्हाला हा विश्वचषक उंचावायचा होता. जरी आम्ही हरलो असतो तरी मी माझी निवृत्ती जाहीर करणारच होतो.’
💬💬 𝗧𝗵𝗶𝘀 𝘄𝗮𝘀 𝗺𝘆 𝗹𝗮𝘀𝘁 𝗧𝟮𝟬 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽: Virat Kohli
King Kohli bids adieu to the T20I format in style and mutual admiration for Captain Rohit Sharma 👏 🫡
Take A Bow on that glorious T20I career! 🙌#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @imVkohli pic.twitter.com/xqur8qmHDF
— BCCI (@BCCI) June 29, 2024
रोहित शर्माचे केले कौतुक
विराट कोहली त्याच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हणाला की, “रोहित शर्माने 9 टी-20 विश्वचषक खेळले आहेत आणि हा माझा सहावा विश्वचषक होता. रोहित संघातील अशी व्यक्ती आहे जो या विजयासाठी सर्वात जास्त पात्र आहे. मला खूप आनंद झाला की आम्ही जिंकू शकलो आणि एवढ्या मोठ्या विजयानंतरच्या भावना शब्दात व्यक्त करणे फार कठीण आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये माझा आत्मविश्वास वाढला होता, पण मला क्रीझवर जाऊन बरे वाटत नव्हते.”
विराट कोहलीचा शेवटचा डाव…
2024 च्या T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीला 7 डावात केवळ 75 धावा करता आल्या होत्या. पण त्याला असेच काही मोठ्या सामन्याचा खेळाडू म्हटले जात नाही. कोहलीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आणि कारकिर्दीच्या अंतिम सामन्यात 76 धावांची अप्रतिम खेळी खेळली आणि तो काय हे दाखवून दिले. दरम्यान, या महत्वपूर्ण खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.