T20 World Cup 2024 (ब्रिजटाऊन) : भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात धावांनी विजय मिळवून 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. आता भारतीय चाहते रोहित शर्माच्या सेनेची वाट पाहत आहेत. मात्र, आतापर्यंत टीम इंडियाच्या प्रस्थानाबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. दरम्यान, बार्बाडोसमधील वादळामुळे भारतीय संघाच्या पुनरागमनाला आणखी काही दिवस लागू शकतात, अशी बातमी समोर येत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. यापूर्वी 2007 मध्ये तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले विजेतेपद पटकावले होते. विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे चाहते त्यांना भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. मात्र, चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
बार्बाडोसमध्ये हवामान कसे आहे?
#WATCH | Hurricane hits Barbados, airport shut down until further order. Curfew imposed in the city from 6 pm, all stores and offices shut down.
Team India and media from India stuck in Barbados as all flights cancelled. pic.twitter.com/j9OvGWp0Ot
— ANI (@ANI) July 1, 2024
वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून बार्बाडोसमधील हवामान खराब आहे. हवामान अहवालानुसार पुढील काही तासांत तेथे बेरील नावाचे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ताशी 170-200 किमी वेगाने वारे वाहू शकतात. अशा स्थितीत ब्रिजटाऊनचे विमानतळ बंद करण्यात आले आहे. सर्व उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत.
टीम इंडियाला देखील हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे मायदेशातील आगमन लांबणीवर गेले आहे. बीसीसीआय त्याच्यासाठी चार्टर प्लेनची व्यवस्था करू शकते, अशी बातमी देखील समोर येत आहे.