T20 World Cup 2024 (SA vs IND,Final) – टी-20 विशव्करंडक स्पर्धेचा अंतिम सामना आज (शनिवार) भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. तसे पाहायला गेले तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच आयसीसीच्या इतक्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यानी यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत ज्या पद्धतीने खेळ केला तो पाहता त्यांना संभाव्य विजेता म्हणता येइल. दुसरीकडे यंदाच्या स्पर्धेत एकही सामना न गमावलेला भारतीय संघ असल्याने विजेतेपदाचा करंडक हाच संघ उंचावेल अशीही अपेक्षा आहे.
टी-20 विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी मोठे योगदान दिले आहे. मात्र, त्यांना फिरकी गोलंदाजी अद्याप निट खेळता आलेली नाही हाच धागा पकडून भारतीय संघ फिरकीवर जास्त अवलंबून राहणार आहे हे निश्चित. दक्षिण आफ्रिकेचे क्वांटन डीकॉक, रझा हेड्रीक्स, एडन मार्करम असे खंदे फलंदाज भारताच्या गोलंदाजीवर कीती यशस्वी ठरतील हेच महत्वाचे आहे. तसेच त्यांच्याकडे मार्को यान्सेन, अनरीच नोर्जे व कागिसो रबाडा असा वेगवान मारा आहे. तसेच केशव महाराजसारखा अनुभवी फिरकी गोलंदाजही आहे. मात्र, त्यांना भारताची बलाढ्य फलंदाजी कशी रोखायची याची योजना तयार करावी लागणार आहे.
विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या प्रत्येक प्रमुख फलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्याच जोरावर भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शखला आहे. अर्थात त्यात गोलंदाजांचेही मोठे योगदान आहे. त्यातही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग हे भरात आहेत. मोक्याच्या क्षणी गडी बाद करण्याची त्यांची हतोटी आहे. विराट कोहलीचे अपयश हाच भारतीय संघासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण स्पर्धत त्याने सलामीला फलंदाजी करताना एकही आत्मविश्वासदायक खेळी केलेली नाही. या उलट कर्णधार रोहित शर्माने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2) : रनमशीन ‘विराट कोहली’ पुन्हा ठरला अपयशी…
मधल्या फळीत ऋषभ पंत खेळतो मात्र, त्याच्याकडून अनावश्यक फटके मारल्याने आपली विकेट गमावण्याची कायम वेळ आली आहे. सूर्यकुमार यादवही भरात आहे. अष्टपैलु हार्दिक पंड्या याच्याकडून अंतिम लढतीत भारतीय संघाला खूप अपेक्षा आहेत. तो बळी मिळवत आहे किंवा धावाही करत आहे परंतू त्यात सातत्य दिसलेले नाही. या सामन्यात तरी तो या दोन्ही बाबतीत यशस्वी ठरेल अशी अपेक्षा संघ व्यवस्थपनाने ठेवली आहे. रवींद्र जडेजाकडूनही संघाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, अद्याप त्यालाही यश आलेले नाही.
कुलदीप-अक्सर निर्णायक ठरतील
या संपूर्ण भारताच्या कुलदीप यादव व अक्सर पटेल यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक संघांना अडकवले. त्यांनीच दरवेळी मोक्याच्या क्षणी बळी मिळवत संघाचे विजय साकार केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा क्वांटन डीकॉक वगळता एकाही फलंदाजाला फिरकी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवता आलेले नाही. त्यातच कुलदीप व अक्सरने समोरच्या संघांवर सातत्याने दडपण राखले आहे.