Delhi heatwave – दिल्लीला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत असल्याने, उष्माघाताच्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात अशा रूग्णांसाठी विशेष व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
आरएमएलच्या आपत्कालीन औषध विभागाच्या प्रमुख, डॉ. सीमा वासनिक यांनी सांगितले की, रूग्णालयात येणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांसाठी बर्फाने भरलेले टब तयार केले आहेत.
आरएमएल हॉस्पिटलमध्ये, जर एखादा उष्माघाताचा रुग्ण गंभीर परिस्थितीत आला तर त्याला रेड झोनमध्ये नेले जाते, त्याला इंट्यूबेटेड मधे ठेवले जाते, आमच्याकडे पुरेसे टब आहेत. रुग्णाला व्हेंटिलेटरवर आणि बर्फ आणि थंड पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये ठेऊन त्याच्यावर उपचार केले जातात.
उष्माघातावर लवकरात लवकर उपचार सुरू होणे गरजेचे आहे; अन्यथा, मृत्यूदर ८० टक्क्यांपर्यंत जातो जाऊ शकतो. आणि जर रुग्णाला लवकर उपचार दिले तर मृत्यूदर १० टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो.
टक्के. ३० मे रोजी देशभरातील ४१ ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्याचे भारतीय हवामान विभागाने नोंदवले. दिल्लीत सफदरजंग येथे ४५.६, पालम ४६.४, रिज ४६.७ आणि आयानगर ४७.० अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की, वायव्य आणि मध्य भारतात उष्णतेची लाट ३० मे पासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.