Sharad Pawar on Ashadhi Wari । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र आता याच चर्चांना खुद्द शरद पवारांनी पूर्णविराम लगावला आहे. याविषयी त्यांनी आपण पायी वारी चालणार नसल्याचे म्हटले आहे. शरद पवार 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यावर शरद पवार यांनी,”मी वारीत चालणार बातमी खोटी आहे.” असे म्हटले आहे.
“मी पायी चालणार ही बातमी खोटी” Sharad Pawar on Ashadhi Wari ।
पुण्यातील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी वारीच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार म्हणाले, “मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे.” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पावर शरद पवार म्हणाले….Sharad Pawar on Ashadhi Wari ।
शरद पवारांनी अर्थसंकल्पावरदेखील आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र हे दोन नंबरचे कर्जबाजारी राज्य आहे. तुमच्याकडे खिशात काय? हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते हे मी सांगायची गरज नाही. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतला आहे आणि म्हणून अशाप्रकारची आखणी केली आहे. ठिक आहे, आखणी केली. तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार असं जाहीर केलं. आता दिवस फार राहिले नाहीत. आता थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, आम्ही त्याची वाट बघतोय.
हेही वाचा
“आपलं एकच लक्ष्य आगमी विधानसभा निवडणूक” ; शरद पवार यांनी दिली कबुली