Sandip Deshpande । आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संदीप देशपांडे केलेल्या विधानाची सध्या चर्चा रंगली आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा कुठलाही आदेश राज ठाकरे यांनी दिलेला नाही. असं विधान देशपांडे यांनी माध्यमांशी बोलतांना केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
आज सकाळपासून मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अशात माहीममधील लॉस एंजलिस शाळेत संदीप देशपांडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी संदीप देशपांडे पुढे म्हणाले,’मुंबईचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सुशिक्षित लोकांचे अनेक प्रश्न आहेत. या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा कुठलाही आदेश राज ठाकरे यांनी दिलेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला जे वाटेल, त्याला मतदान करू शकतं, असेही देशपांडे म्हणाले. राज ठाकरे यांनी पाठिंबा देण्यासंदर्भात कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या म्हणण्यांनुसार, आम्हाला वाटतं तसं मतदान करू,असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चां उधाण आले आहे.