Raosaheb Danve । लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झालं. मात्र, या निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ विरोधकांनी चारली. या दिग्गज नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे. यात खास चर्चेत राहिले ते बीडमधून पंकजा मुंडे आणि जालना मतदारसंघामधून रावसाहेब दानवे. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सध्या करण्यात येतीय. तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाचा दौरा सुरू करत कामाला जोमाने सुरुवात केलीय. त्यातच त्याचे एक विधान सध्या चर्चेत आले आहे.
…तर मी गावचा सरपंच होईन Raosaheb Danve ।
मतदारसंघाचा दौरा करत असताना रावसाहेब दानवे यांनी,“मी ३५ वर्षे आमदार, खासदार राहिलो. आता पक्षाने जर मला गावचा सरपंच होण्यास सांगितलं तर मी गावचा सरपंच होईन. कारण गावचा सरपंच झालं तर गावचा विकास तरी करता येईन”, असे म्हटले. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
पक्षाकडून महाराष्ट्रभर चिंतन बैठका सुरु Raosaheb Danve ।
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे महायुतील मोठा धक्का बसला. यानंतर आता महायुतीच्या जागा का कमी निवडून आल्या? यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. तसेच भाजपाच्यावतीने महाराष्ट्रभर चिंतन बैठकी सुरु आहेत. या अनुषंगाने रावसाहेब दानवे हे देखील मराठवाड्यातील काही मतदारसंघात दौरे करत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसेच या माध्यमातून विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा देखील घेतला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून भाजपकडून रावसाहेब दानवे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते डॉ.कल्याण काळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना धक्का बसला.
हेही वाचा
पुणे ड्रग्ज प्रकरण तापले; सुषमा अंधारेंच्या आरोपावर शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; म्हणाले…