नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी आहेत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच, राहुल गांधींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम केलं अशी टीकादेखील त्यांनी राहुल गांधीवर केली आहे.,
नेमके काय म्हणाले रामदास आठवले?
“राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटलं, ते स्वतः दहशतवादी आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणं चुकीचं आहे. राहुल हिंदू समाजाला तोडण्याचं काम करत आहेत.” अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व धर्मांनी दिलेल्या शिकवणुकीचा उल्लेख केला. यानंतर ते म्हणाले की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात. तुम्ही लोक अजिबात हिंदू नाही. हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही. राहुल यांचं हे वक्तव्य ऐकून सत्ताधारी चांगलेच संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.