Ravikant Tupkar | लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून न जाता राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने व मोर्चे चालूच ठेवावेत, असे विधान राजू शेट्टी यांनी केले.
तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठकीतआगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. तर दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. राजू शेट्टी हे महान व्यक्ती असून ते राज्यातील 288 काय तर देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक विधानसभा जागा लढवतील. त्यांची मोठी ताकद असल्याचा टोल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना लगावला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठकीत विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय नियोजन करण्यात आले? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रविकांत तुपकर म्हणाले, “मला त्या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं. त्यामुळे काय ठरलं मला माहिती नाही. राजू शेट्टी महान नेते आहेत. ते 288 काय देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभेला उमेदवार उभे करू शकतात. कारण त्यांची ताकद फार मोठी आहे”, असा खोचक टोला रविकांत तुपकर यांनी लगावला.
रविकांत तुपकरांचा सरकारवर निशाणा Ravikant Tupkar |
“शेतकर्यांना देशोधडीला या राज्यातील सरकारने लावले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करतं. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पीककर्ज मिळत नाही. बुलढाणा जिल्ह्यात फक्त 28 % पीककर्ज वाटप झाले. तर बँका गोड बोलून शेतकऱ्यांकडून कर्ज भरून घेत आहेत, मात्र ज्यावेळी पेरणीची वेळ येते त्या वेळी पीककर्ज शेतकऱ्यांना देत नाही. शेतकऱ्यांचे सेविंगचे पैसे परस्पर खात्यात जमा करण्याचा सपाटा बँकांनी लावला आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. यावेळी मुख्यमंत्री, अर्थमंत्री काय करत आहेत?,” असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला.
…तर आम्ही पिकविम्याचे कार्यालय ठेवणार नाही Ravikant Tupkar |
पुढे ते म्हणाले, “पेरणी झाल्यानंतर पीक कर्जाचा फायदा काय? पीक कर्ज मुळात पेरणीसाठी मिळायला पाहिजे, असा त्याचा हेतू असतो. मात्र, बँकांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा देखील मिळाला नसल्याने मी कृषिमंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यांनी आश्वासन दिले की आगामी काळात लवकर पीकविमा शेतकऱ्यांना मिळेल. तसेच तो मिळाला नाही तर आम्ही पिकविम्याचे कार्यालय ठेवणार नाही,” असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला.
हेही वाचा:
‘पटनायक सरकारने माझ्या हत्येचा कट रचला होता’ ; ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचा BJD वर गंभीर आरोप