Rahul Gandhi And Sanjay Raut| काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल सभागृहात पहिले भाषण केले. यावेळी राहुल यांनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवले, ज्यावर सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“हिंदुत्वाचा ठेका हा मोदींनी घेतलेला नाही” Rahul Gandhi And Sanjay Raut|
“राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाच्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला. राहुल गांधी यांनी काय चुकीचं सांगितलं? उद्धव ठाकरे ज्या प्रकारे उत्तर देतात, त्याच प्रकारे काल राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे सांगतात आम्ही भारतीय जनता पक्षाला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही. राहुल गांधींनी सभागृहात सांगितलं की, हिंदुत्वाचा ठेका हा मोदींनी घेतलेला नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले, “राहुल गांधींनी भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा काढला, सत्ताधाऱ्यांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण माघावं लागलं, एकटे राहुल गांधी हे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह ९ मंत्र्यांना भारी पडले आहेत. कालपर्यंत यांच्यापासून आम्हाला संरक्षण माघावं लागत होतं. एवढी यांची दादागिरी होती. राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणले. मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो? हे देशाला काल दिसलं. ही सुरुवात आहे अजून पुढे काय होतं ते पाहा”, असा इशारा संजय राऊतांनी दिला. Rahul Gandhi And Sanjay Raut|
काय म्हणाले होते राहुल गांधी ?
दरम्यान, सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले होते की, “भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. याचे कारण भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला की घाबरू नका. दुसरीकडे स्वत:ला हिंदू म्हणवणारे चोवीस तास हिंसा-हिंसा-हिंसा आणि द्वेष-द्वेषाने जगतात. तुम्ही अजिबात हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे.
भगवान शिव हे आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मला भगवान शंकर यांच्याकडून मिळाली. आम्ही कोणतीही हिंसा न करता सत्याचे रक्षण केले आहे. परंतु त्यांच्यासाठी (भाजप) फक्त सत्ता महत्त्वाची असल्याचे म्हणत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला होता.
हेही वाचा :