Prashant Kishor On Nitish Kumar । केंद्रात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यात जनता दल युनायटेड (JDU) किंग मेकरच्या भूमिकेत आहे. असे असतानाही नितीश कुमार यांच्या पक्षाला केंद्रात मोठे मंत्रिमंडळ मिळालेले नाही. जेडीयू सभापतीपदाची मागणी करेल असे तर्क लढवले जात होते. पण तसे झाले नाही. दरम्यान, जनसुराजचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांकडून कोणत्याही मोठ्या पदाची मागणी का करण्यात आली नाही याचं कारण सांगितलं आहे.
नितीशकुमारांनी मोठे मंत्रालय का मागितले नाही? Prashant Kishor On Nitish Kumar ।
एका मेळाव्याला संबोधित करताना प्रशांत किशोर यांनी हा दावा केला आहे. यावेळी बोलताना,”मुख्यमंत्री नितीश कुमार यांची इच्छा असेल, तर ते बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात कारखाना सुरू होईपर्यंत पाठिंबा देणार नाही, अशी मागणी करू शकतात, परंतु त्यांनी विचारले नाही. काही लोक म्हणाले की, “मोठी मागणी करू. मंत्रिपद, पण नितीश कुमार यांना माहीत आहे की, एखादा माणूस मोठा मंत्री झाला तर पक्षात स्पर्धा होईल, नितीश कुमार यांनी एकच मागितले की ते 2025 नंतरही मुख्यमंत्री राहतील.”
‘नितीश कुमार भाजपची मजबुरी’
नितीश कुमार हे भाजपचे असे मजबुरी बनले आहेत, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “भाजपने नितीशकुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवले तर तिकडे भाजपच्या लोकांना दिल्ली वाचवणे कठीण होईल.”असाही दावा त्यांनी केला. तर दुसिकडे नितीशकुमारां आपले मुख्यमंत्रीपद धोक्यात घालायचे नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जेडीयूच्या दोन नेत्यांना मंत्री Prashant Kishor On Nitish Kumar ।
यावेळी एनडीए सरकारमध्ये एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यामध्ये बिहारमधील 8 खासदारांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले. यापैकी जेडीयूच्या दोनच खासदारांना मंत्री करण्यात आले आहे. जेडीयूचे राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायत राज मंत्री, तर रामनाथ ठाकूर यांना राज्यमंत्री बनवण्यात आले आहे.
हेही वाचा
Delhi Airport । पावसात दिल्लीच्या IGI विमानतळावर भीषण अपघात, टर्मिनल-1 चे छत कोसळले