Praful Patel on Legislative Council । राज्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पुढच्या महिन्याच्या 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीच्या 2 उमेदवार विजयी होऊ शकतात. परंतु, अजूनही कोणत्या राजकीय पक्षांनी याबाबत उमेदवारांबाबत घोषणा केलेली नाही. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार याबाबत पक्षाकडून माहिती समोर आलीय.
उद्या संध्याकाळी यावर चर्चा Praful Patel on Legislative Council ।
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा विधान परिषदेचा उमेदवार उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी उद्या संध्याकाळी बैठक बोलावल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही कमी कालावधी राहिला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे उद्या संध्याकाळी यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, महायुती विधानपरिषेच्या 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवू शकते. भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीतून कुणाला संधी दिली जाणार यावरून सध्या पक्षात जोरदारपणे चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा योग्य नाहीत Praful Patel on Legislative Council ।
राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा योग्य नाहीत. सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर एकत्रित बसून पुढील मुख्यमंत्रीपदा संदर्भात निर्णय होईल. महायुती एकत्रितपणेच विधानसभा निवडणुकींना सामोरे जाईल, असा दावाही पटेल यांनी केला आहे.
राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-1 टर्मिनलवरील छताचा भाग कोसळला होता. या प्रकरणात प्रफुल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्ली विमानतळावर जे शेड पडले आहे ते 2008 – 09 मध्ये उभारण्यात आले होते पंधरा वर्षे पूर्वीच्या निर्माण कार्याबद्दल तेव्हा जो मंत्री होता त्याला जबाबदार ठरवणे योग्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल असे ते म्हणाले.
हेही वाचा
उद्धव ठाकरे पुन्हा मुंख्यमंत्री होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं