तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन ओढ्याप्रमाणे वाहत आहे. या पाण्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कामांची पोलखोल केली आहे. नगरपरिषदेने पावसाळी पूर्वी केलेल्या साफसफाईच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
तळेगावमध्ये पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले , मोठी गटर्स साफसफाईची कामे ९० टक्के पर्यंत पूर्ण झाली असल्याचा दावा नगरपरिषदेकडून करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या गटारीचे साफसफाईचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले होते. परंतु सध्याची परिस्िथती पाहता नगरपरिषदेने नेमके कुठे काम केले असा प्रश्न उपस्िथत होत आहे.
दिनांक २० रोजी सायंकाळी चार वाजताचे दरम्यान मोठा पाऊस झाला व या मोठ्या गटारीच्या साफसफाईच्या कामाची प्रामाणिकता नागरिकांसमोर आली. वाहून आलेल्या पाण्यामुळे जिजामाता चौकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती गाड्यांचे पाणी उडत होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी साफसफाईचे काम केलेले असताना रस्त्यावर पाणी आलेच कसे असा प्रश्न उपस्िथत केला आहे.