Narendra Modi | Rahul Gandhi | Days Of Emergency – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त त्या काळ्या दिवसाचे स्मरण करून काँग्रेसला त्यांच्या धोरणांची आठवण करून दिली. यासोबतच मोदींनी त्या सर्व लोकांचीही आठवण केली ज्यांना या निषेधाची किंमत प्राण देऊन चुकवावी लागली. मोदींनी या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधत सलग चार पोस्ट केल्या.
25 जून ही इतिहासातील ती काळी तारीख, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयाची किंमत असंख्य निष्पाप लोकांना प्राण देऊन चुकवावी लागली होती. 1975 साली याच दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.
25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली आणि ती 21 मार्च 1977 पर्यंत म्हणजेच 21 महिने टिकली. आज आणीबाणीला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण इतिहासाचा तो काळा अध्याय आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.
The #DarkDaysOfEmergency were very challenging times. In those days, people across all walks of life came together and resisted this attack on democracy. I also had numerous experiences working with various people during that time. This thread gives a glimpse of that… https://t.co/VlVlBz9UyT
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2024
काँग्रेसने मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केले
आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व महापुरुष आणि महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आजचा दिवस आहे. आम्हाला आठवण येते की काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्य कसे नष्ट केले आणि प्रत्येक भारतीय ज्याचा आदर करतो त्या भारताच्या संविधानाचा चुराडा केला.
The mindset which led to the imposition of the Emergency is very much alive among the same Party which imposed it. They hide their disdain for the Constitution through their tokenism but the people of India have seen through their antics and that is why they have rejected them…
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2024
काँग्रेसने देशाचे तुरुंगात रुपांतर केले
सत्तेत राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाकडे दुर्लक्ष केले आणि देशाला जेलमध्ये रुपांतरीत केले. काँग्रेसशी असहमती व्यक्त करणाऱ्यांना छळले. अशी धोरणे सर्वात दुर्बल घटकांना लक्ष्य करण्यासाठी सामाजिकदृष्ट्या लागू करण्यात आली होती.
Those who imposed the Emergency have no right to profess their love for our Constitution. These are the same people who have imposed Article 356 on innumerable occasions, got a Bill to destroy press freedom, destroyed federalism and violated every aspect of the Constitution.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2024
काँग्रेसचा माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला
ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या संविधानावर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी कलम 356 अगणित प्रसंगी लागू केले. वृत्तपत्र स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यासाठी, संघराज्य नष्ट करण्यासाठी आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन करण्यासाठी हे विधेयक आणले गेले.
Just to cling on to power, the then Congress Government disregarded every democratic principle and made the nation into a jail. Any person who disagreed with the Congress was tortured and harassed. Socially regressive policies were unleashed to target the weakest sections.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2024
काँग्रेस संविधानाचा अवमान लपवते
ज्या मानसिकतेमुळे आणीबाणी लादली गेली ती मानसिकता आजही त्याच पक्षात कायम आहे. आणीबाणी कोणी लागू केली होती? काॅंग्रेसचे लोक प्रतिकात्मकतेतून संविधानाबद्दलचा तिरस्कार लपवतात. पण भारतातील जनतेने त्यांची कृती पाहिली आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या पक्षाला वारंवार नाकारले आहे.