राहाता, (प्रतिनिधी)- येथील साईयोग फाउंडेशनद्वारे पुण्यशलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ जयंती स्वच्छ्ता अभियान राबवून साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. साईयोग फाऊंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी प्रास्तविक केले.
अनिल सातव व रविंद्र धस यांनी मनोगत व्यक्त करतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. शालिनीताई विखे पाटील यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत स्वच्छते बाबत अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी पत्रकार किरण वाबळे,दशरथ तुपे, संदीप डांगे, उपसरपंच संजय डांगे, गोरखनाथ दंडवते, विलास वाळेकर, भारत दवंगे, मोहन तांबे, दीपक दंडवते, बबलू फटांगरे, संजय वाघमारे, उमेश लुटे, व्यंकटेश अहिरे, रविंद्र धस,
नारायण गाडेकर, शिवाजी पोटे, प्रकाश बेंद्रे, अशोक वाघ, राजेंद्र धुमसे, संदीप डांगे, संजय बाबर, सिताराम बावके,आप्पासाहेब माळवदे,आण्णासाहेब कांदळकर,विठ्ठल निर्मळ, भास्कर बावके, बाळासाहेब तारगे, मनोज पिपाडा आदी मान्यवर उपस्थित होते.