पिंपरी, (प्रतिनिधी) – आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी फेसाळली आहे. वारकर्यांच्या जिवाशी सातत्याने खेळले जातेय. नदी प्रदूषणाचा हा खेळ लोणावळा ते पिंपरी चिंचवड दरम्यान होत असल्याचा निष्कर्ष आता समोर आला आहे.
त्याचअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना नोटीस धाडली आहे.
या आस्थापनांनी कार्यालयांनी त्यांचे एसटीपी प्लांट अद्यावत केले नसल्याने तसेच त्यातून दूषित पाणी नदीत सोडल्याने इंद्रायणीची अशी दयनीय अवस्था झाल्याची बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व्हेक्षणात समोर आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ सर्वेक्षण आणि चर्चांच्या पुढे कार्यवाही जात नसल्याचे दिसून आले आहे. संबंधित विभाग केवळ कागदी घोडेच नाचवत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीतील काही कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडत असल्याची ओरड होती. मात्र आता अशी कोणतीच कंपनी नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडत नसल्याचा दावा प्रदूषण मंडळाने केला आहे.
हा दावा करतानाच पिंपरी चिंचवड महापालिका ते लोणावळा दरम्यानच्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींना यात दोषी ठरविले आहे. मात्र केवळ नोटीस बजावून इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेणार का? याचे उत्तर प्रदूषण मंडळाकडे नाही.
त्यामुळे प्रदूषण मंडळाने केवळ नोटीसी धाडण्यात धन्यता न मानता या शासकीय कार्यालयांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. तेव्हाच वारकर्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल.
नदीच्या प्रदूषणात सातत्याने वाढ
मागील अनेक वर्षांपासून नदीच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. अनेक वर्षांपासून वारकरी आणि गावकर्यांनी यासंदर्भात प्रशासनानाला निवेदने दिली आहेत. मात्र त्यावर कोणीही तोडगा काढला निघाला नाही आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, इंद्रायणी नदी फेसाळल्यानेे वारकर्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. वारकरी इंद्रायणी नदीच्या पाण्यात स्नान करतात. पाणी तीर्थ म्हणून पितात. त्यामुळे या नदीकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सात महिने उलटले तरी परिस्िथती जैसे थे
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कार्तिकीवारीपूर्वी इंद्रायणीनदी मोठ्या प्रमाणावर फेसाळलेली होती. त्यावेळीदेखील कोणत्याच यंत्रणेला हा विषय गांभिर्याने घ्यावा, असे वाटले नाही. आता सात महिन्याच्या कालावधीनंतरही नदी प्रदूषणाचा विषय ‘जैसे थे’ आहे.
आता प्रसारमाध्यमाममधून यावर सडकून टिका होऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने तयावर कार्यवाही सुरू केल्याचे दाखविण्यास सुरुवात केली आहे. लागल्याने खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने तयावर कार्यवाही सुरू केल्याचे दाखविण्यास सुरुवात केली आहे.