Manoj Jarange Patil | Pankaja Munde : सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने निवडणुकीसाठी उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास टाकून त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले आहे.
तसेच सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांनादेखील भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मविआचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला.
यानंतर आता भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर भाष्य केलंय. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
नेमकं मनोज जरांगे काय? म्हणाले….
पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणल्याने भाजप थोडी घेणार त्यांना विधान परिषदेवर घेणार नाही… पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचा कारणच नाही. आम्ही यापूर्वीही कधी विरोध केला नाही.
मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानले. त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पद मिळालं मराठ्यांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात होत्या. मराठ्यांनी त्यांना कधी विरोध केला नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे यांना आमदार करणं न करणं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे… मराठ्यांचा काही देणं घेणं नाही. आम्ही त्याचं स्वागत केलं आणि नाही केलं तरी त्यांच्यात काही फरक पडणार नाही. त्यांच्या समाजाचा मत परिवर्तन होत असेल तर नक्की कौतुक आहे, असं देखील मनोज जरांगे यावेळी म्हणाले.