मायणी (प्रतिनिधी) – पडळ साखर कारखान्याचा सर्व कामगार वर्ग व अधिकाऱ्यांच्या समन्वयातून नेटके नियोजन केल्यामुळे हा साखर कारखाना गेली सहा वर्षे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
गेल्या सहा वर्षात कारखान्याने नवीन उभारणी करून कारखान्याचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला असून आगामी गळीत हंगामात सात लाख टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केले जाईल ,असा विश्वास खटाव-माण को अॅग्रो प्रो. लिमिटेड साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केला.
खटाव-माण तालुका को- ऍग्रो प्रो.लिमिटेड पडळ ता. खटाव या साखर कारखान्याच्या ६व्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन प्रसंग निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. सदर समारंभास कारखान्याचे को- चेअरमन मनोज घोरपडे , कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालिका प्रीती घार्गे पाटील, संचालक महेश घार्गे, कृष्णात घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
को-चेअरमन मनोज घोरपडे म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून साखरेचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रतिवर्षी शेतकऱ्यांना उसाचा चांगला दर देता येणे शक्य होईल.
हार्वेस्ट ,वाहतूक , डिस्टीलरी आदी प्रकल्प सुरू झाले असून कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे . घार्गे साहेबांच्या मार्गदर्शनातून साखरेचे उत्पादन चांगले वाढवून शेतकऱ्याच्या उसा चांगला दर देता येईल असा प्रयत्न केला जाईल.
कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे म्हणाले, यावर्षी परिसर व इतरत्र पाऊसमान चांगले आहे. गतवर्षी ६ लाख १८हजार मॅट्रिक्ट गाळप झाले आहे.
यावर्षीच्या गळीत हंगामात सात लाख गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठरविले आहे. जवळपास 120 दिवसांचा सीजन होऊन 1 रिकवरी मिळालेली आहे.
कारखान्याचे जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून कारखान्याच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली.