Devendra Fadnavis| राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच आज वाढत्या पेपरफुटीच्या घटनांचा मुद्दा चर्चेत आला. सध्या राज्यातील विविध भरती प्रक्रियेतील पेपरफुटीची प्रकरण समोर येत आहेत. ज्यामुळे परिक्षा रद्द कराव्या लागत आहेत.
ज्यानंतर विद्यार्थांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. याप्रकरणी पेपर फुटीविरोधातील कायदा सरकार याच अधिवेशनात आणणार का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्याचा पेपर फुटीचा कायदा आणणार
पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्याचा पेपर फुटीचा कायदा आणणार, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात केली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी आज विधानसभेत यांनी मागच्या काही दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा तलाठी भरती अशा विविध परीक्षांचे पेपर फुटले आहेत. त्यामुळे राज्यात पेपर फुटीविरोधात कायदा याच अधिवेशनात आणणं गरजेचं आहे, असे म्हंटले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी “पेपरफुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा करण्याचा मनोदय मागच्या सरकारने केला होता. त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भातील कायदा आणायचा आहे आणि तो कायदा आपण याच अधिवेशनात आणणार आहोत”, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुढे फडणवीस म्हणाले की, “तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथं घोटाळा झाला नाही. त्यामुळे परिक्षा रद्द करण्यात आली होती. पण आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला आहे. पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात आहे , आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे.”
हेही वाचा:
नाशिक शिक्षक मतदारसंघात पाच मतपत्रिका जास्त आल्या कशा? ; उद्धव ठाकरेंचा थेट नाशिकला फोन