RAMDAS ATHAWALE । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राहुल गांधी दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सभागृहात हिंदूंबाबत वक्तव्य केले. स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे लोक हिंसा आणि द्वेष पसरवत असल्याचे राहुल म्हणाले होते. याबाबत मीडियाने केंद्रीय मंत्री आठवले यांना प्रश्न केला असता त्यांनी राहुलला दहशतवादी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले,’राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटले, ते स्वतः दहशतवादी आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणे चुकीचे आहे. राहुल गांधी हिंदू समाजाला तोडण्याचे काम करत आहे.” राहुल यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ सुरू आहे. काँग्रेस खासदाराने सभागृहात आपले म्हणणे मांडले तेव्हा चांगलाच गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: उभे राहून स्पीकर ओम बिर्ला यांना सांगितले की, ‘संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब आहे.’
तत्पूर्वी, राहुल यांनी आपल्या भाषणाला ‘जय संविधाना’च्या घोषणा देऊन सुरुवात केली. संविधानाची प्रत हातात घेऊन आम्ही तिचे रक्षण केल्याचे सांगितले. त्याच्या रक्षणासाठी देश एकत्र आला आहे. भाजपचे लोक संविधान-संविधान म्हणतात हे पाहून बरे वाटते.
यावेळी राहुल यांनी सभागृहात भगवान शिवाचे चित्र दाखवले, ज्याला सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला त्यावेळी राहुल गांधींनी त्यांना नियमांचे पुस्तक दाखवले. यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.