Monsoon in Maharashtra । राज्यात काही ठिकाणी पावसाचे म्हणचे तसे आगमन झाले नाही. मात्र आता राज्यात पाऊस सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येतंय. राज्यातील कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर विदर्भात प्रति तास ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवलाय.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र Monsoon in Maharashtra ।
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मोसमी पाऊस शुक्रवारी (२८ जून) राजधानी दिल्लीत दाखल झाला. राजस्थानमधील जैसलमेर, चुरू, दिल्ली, अलिगड, कानपूर, गाझीपूर खेरी, मुरादाबाद, उना, पठाणकोट आणि जम्मू अशी मोसमी पावसाची उत्तर सीमा आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि जम्मूमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे.
शनिवारसाठी हवामान विभागाचा इशारा Monsoon in Maharashtra ।
दरम्यान, राज्यातील रत्नागिरी, रायगड, पुणे याठिकाणी हवामानविभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर आणि विदर्भात येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.