सासवड, (प्रतिनिधी) – वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेसने विभागवार दुष्काळ पाहणी समिती गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली यामध्ये असून यामध्ये पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांची नियुक्ती केली आहे.
दुष्काळ पाहणी समितीमध्ये 13 सदस्य आहेत. यामध्ये माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, आमदार प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, संजय जगताप, विक्रमसिंह सावंत, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे, रवींद्र धंगेकर,
जयंत आसगावकर तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे या समितीचे समन्वयक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून या जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.