Mamata Banerjee । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या विधानांसाठी ओळखल्या जातात, कारण त्या उघडपणे काहीही मांडायला मागेपुढे पाहत नाहीत. असच काही नुकतंच घडलं आहे. ज्यावेळी त्यांनी,”न्यायव्यवस्था पूर्णपणे शुद्ध आणि प्रामाणिक असली पाहिजे. न्यायव्यवस्थाही राजकीय पक्षपातीपणापासून मुक्त असायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
ममतांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे कारण त्यांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत या गोष्टी बोलल्या होत्या. बंगालची राजधानी कोलकाता याठिकाणी ‘नॅशनल ज्युडिशियल अकादमी’च्या पूर्व क्षेत्र-दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन झाले. त्यात सहभागी होण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवगननम हेही उपस्थित होते.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? Mamata Banerjee ।
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार,”बंगालच्या मुख्यमंत्री ममता म्हणाल्या,”याबद्दल बोलल्याबद्दल मी माफी मागते. माझा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा नाही. पण माझी नम्र विनंती आहे की कृपया लक्षात ठेवा की,”न्यायव्यवस्थेमध्ये कोणताही राजकीय पक्षपाती नसावा. न्यायव्यवस्थेने हे करावे. शुद्ध, पूर्णपणे शुद्ध आणि प्रामाणिक व्हा, जेणेकरून लोक तिची पूजा करतील.” असे त्यांनी म्हटले.
न्यायव्यवस्था हे लोकांसाठी महत्त्वाचे मंदिर आणि न्याय देणारी सर्वोच्च संस्था असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “हे मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चसारखे आहे. न्यायव्यवस्था ही लोकांची, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असते… आणि न्याय मिळवण्यासाठी आणि घटनात्मक अधिकारांचे समर्थन करण्यासाठी अंतिम सीमा असते.” असं त्या म्हणाल्या,
ममता बॅनर्जींनी न्यायव्यवस्थेबाबत का दिले वक्तव्य? Mamata Banerjee ।
कलकत्ता उच्च न्यायालयाने अलीकडेच 2016 च्या शिक्षक भरती चाचणी अंतर्गत नियुक्त्या रद्द केल्या होत्या. याबाबत सीएम ममता यांनी उच्च न्यायालयावर टीका केली होती. भाजप नेत्यांच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेच्या एका विभागावर प्रभाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचवेळी हा निकाल देणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी आपले पद सोडले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
यामुळेच निवडणूक प्रचारादरम्यान ममता म्हणाल्या होत्या की, “तरुण तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मी न्यायावर बोलू शकत नाही, पण निर्णयांवर भाष्य नक्कीच करू शकते.” आहे.” पुढे त्यांनी गंगोपाध्याय यांच्या माध्यमातून दिलेल्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. अभिजीत गंगोपाध्याय हेही भाजपच्या तिकिटावर तामलुक लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
हेही वाचा
उद्यापासून क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसह ‘या’ महत्त्वाच्या गोष्टीत होणार बदल; जाणून घ्या काय परिणाम?