बेंगळुरू – सीडब्ल्यूआरसीच्या निर्देशानुसार शेजारच्या तामिळनाडूला पाणी सोडण्यास आम्ही असमर्थ आहोत कारण आम्हाला आता आमच्या राज्यातील पाणी टंचाईची चिंता आहे, त्यामुळे आम्ही आता तामिळनाडुला पाणी सोडू शकत नाही असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटले आहे.
आज येथे या संबंधात निवेदन करताना शिवकुमार म्हणाले की, कावेरी खोऱ्यात पुरेसे पाणी नाही. कावेरी जल नियमन समितीने (सीडब्ल्यूआरसी) सोमवारी कर्नाटकला 1 नोव्हेंबरपासून 15 दिवस तामिळनाडूला दररोज 2,600 क्युसेक पाणी सोडण्याची शिफारस केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी हे निवेदन केले आहे. शिवकुमार यांच्याकडेच जलसंधारण खात्याचा कार्यभार आहे.
ते म्हणाले की, आमच्याकडे पाण्याची सध्या तीव्र टंचाई आहे त्यामुळे आम्हीं पाणी सोडू शकत नाही. कृष्णराजा सागरणात अपुरा पाणी साठा आहे तेथील पाण्याची आवक शुन्य आहे. आमच्याकडे पाणी सोडण्याची ताकद नाही. केआरएस आणि काबिनी धरणांमधून तामिळनाडूला 815 क्युसेक पाणी नैसर्गिकरित्या वाहते. कावेरी खोऱ्यात फक्त 51 टीएमसी पाणी शिल्लक आहे. सध्या, पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी साठवलेले पाणी आवश्यक आहे, असे ते म्हणाले.