Maharashtra । नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दलित समाजाच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रक तयार करून ते राजवाडा येथील रस्त्यावर फेकल्याने पंचवटीत मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये शनिवारी (२२ जून) पंचवटी परिसरात चार तास तणावाचे वातावरण होते
दरम्यान, या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार केला गेल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस…
नाशिकमधील प्रकाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘त्या पत्राबाबत सर्व माहिती पोलिसांनी काढलेली असून काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते. ते पत्र पब्लिश प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेले आहे. हे पत्र काढणारा व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधले जात आहे.’
आरोपीकडून चार मोबाईल, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आणखी कोण यात सामील आहे या चा देखील शोध घेतल्या जात आहे.दंगल घडवण्यासाठी त्याने हे पत्र काढले आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते. त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे. हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमजुती निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय नेत्यांनी या पत्रकाला ट्विट केल्यावरही भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्याकडून हा प्रकार झाला. त्यावर. या प्रकारात शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल. यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, असे यांनी म्हटले आहे.
========================