Jitendra Awad on Ajit Pawar । कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथित विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार, असा इशारा अजित पवार गटाकडून देण्यात आला होता. तसेच राज्य सरकारकडून या मतदारसंघात आता ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. त्याच इशाऱ्याला आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. याविषयी बोलताना,”५० कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल” अशी अपेक्षा ठेवू नका. कारण, जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते अशी टीका आव्हाड यांनी केलीय.
आता मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात Jitendra Awad on Ajit Pawar ।
अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पत्रकार परिषदेत आरोप केले. तसेच कळवा मुंब्रा मतदार संघात ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला. राज्य सरकारकडून कळवा मुंब्रा मतदारसंघातील माजी नगरसेवकांच्या विविध पॅनलमध्ये ५० कोटी रुपयांच्या निधीच्या विकास कामांसाठी वितरण केले जाणार आहे. तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथित विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहे. या विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार ५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात आता झालीय असे त्यांनी म्हटले.
पण, ५० कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल
दरम्यान, या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मुंब्य्रासाठी ५० कोटीचा निधी दिला. त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानतो. पण, ५० कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल; अशी अपेक्षा ठेवू नका. बारामतीला एक हजार कोटीचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
तसेच पुढे बोलताना आमच्याशी गद्दारी करून बाहेर पडल्यानंतर मी अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्यामुळे ते मला निधी देताना हात आखडता घेतील, यात वादच नव्हता. या आधीही तीन वर्षे ते असेच वागत होते. आता माझ्याविरुद्ध ज्याला उभा करायचा आहे. त्याच्या नावे हा निधी दिलेला आहे. एवढेच नाही तर आमच्या नगरसेवकांना पाच कोटीची ऑफरही दिली होती; पण, एकही नगरसेवक त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे आता पन्नास कोटी दिले आहेत. तसे पाहता ते हजार कोटीही आणतील. पण, ज्यांनी हा निधी आणलाय त्यांनी आपल्या वाॅर्डातही बघावे. आपल्या वाॅर्डातील स्लाॅटर हाऊसच्या रस्त्याची काय अवस्था आहे, हे त्यांनी पहावे. आमदाराला निधी न देता जो माणूस आता नगरसेवकही नाही: त्याला निधी दिला गेलाय.
जनतेला गद्दारी कधीच रुचत नाही Jitendra Awad on Ajit Pawar ।
त्यासोबतच “महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडत आहे. याची जनता नोंद घेणारच आहे. कारण, अजित पवारांसोबतच्या आमदारांना त्यांनी हजारो कोटींचा निधी दिला होता. तरीही ते लोकसभेच्या निवडणुकीत मागे पडले. म्हणूनच ते आता आमचे दार ठोठावत आहेत. निधी देऊन मुंब्र्यातील जनता खुष होणार नाही. कारण, येथील जनतेला विकास काय आहे, हे चांगलेच माहित आहे. आणि हा विकास त्यांना कुणी दाखवला हे देखील ते जाणतात. जनतेला गद्दारी कधीच रुचत नाही. अजित पवार हे किती कोत्या मानसिकतेचे आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.