Jaya Kishori । प्रेरणादायी वाक्य ही नेहमीच आपल्या विचारांना दिशा दाखवण्याचे काम करतात. त्यांच्यामध्ये सकारात्मकतेने विचार करायला लावण्याची शक्ती असते. अनेक विचारवंत, धर्मगुरू, साहित्यिक हे नेहमीच अशी प्रेरणादायी वाक्य लोकांना सांगत असतात. जया किशोरी या नव्या पिढीतील लोकप्रिय व्याख्यात्या आहेत. भारतीय अध्यात्म आणि प्रेरणा या विषयावर त्या अतिशय प्रवाहीपणे बोलत असतात. त्यांचे विचार सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी उपयुक्त ठरतात.
त्यांनी सांगितलेली अशीच काही प्रेरणादायी वाक्ये…
१) काळजी घ्या कधी कधी प्रवाह बरोबर जात असताना बुडण्याची भीती असते.
२) तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. काही दिवस निराशेचे, नाराजीचे, दुःखाचे असतील. पण, काही दिवस छोट्या छोट्या गोष्टीत आनंद देणारे असतील.
३) जीवन हा एक तराजू आहे. त्यामुळे कधीही आशावाद संपवू नका.
४) एक छोटासा धैर्याचा क्षण देखील आयुष्यातील निराशा आणि नकारात्मकता कुठच्या कुठे फेकून देऊ शकतो.
५) तुमचा अनादर करण्याचा हक्क कुणालाही नाही हे लक्षात ठेवा आणि स्वतःचा आदर करायला शिका.
६) काही नाती संपतात त्यामागील कारणे लक्षात ठेवा. त्या नात्यांमधील चांगल्या आठवणींमुळे व्याकूळ होऊ नका.
७) सहा तुम्हाला मागे खेचणाऱ्या लोकांबरोबर राहू नका मग ते तुमच्या कितीही परिचयाचे ओळखीचे किंवा जवळचे असले तरी.
८) वेदनाही तात्पुरती असते. त्यातून आपण धडा जो शिकणार असतो तो कायमस्वरूपी असतो.
९) काही व्यक्ती तुमच्यापेक्षा वेगळ्या आहेत, म्हणून त्यांच्यापासून लाज बाळगून लांब राहणे हे काही चांगले नाही.
१०) तुमची वाढ प्रगती आणि नकारात्मकता हे हातात हात घालून चालू शकत नाही.
११) तुम्हाला स्वतःची चांगली ओळख झाली असेल तर आयुष्यात तुम्ही कधीही एकटे नसता.
१२) सर्व गोष्टी सुरळीत आणि योग्य प्रकारे होणार आहेत दैवी शक्ती वर विश्वास ठेवा आणि चांगले काम करत रहा.
१३) तुमच्या योजना आणि नियोजन त्यांना समजणार नाही, कारण त्यांच्याकडे स्वतःचेच नियोजन नसते.
१४) तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नसून तुम्हाला कुठे पोहोचण्याची इच्छा आहे हे महत्त्वाचे आहे.
१५) आयुष्यात चांगल्या गोष्टींना सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. कालच्या पेक्षा आजचा दिवस चांगला असे म्हणून चांगल्या गोष्टी करण्यास सुरुवात करावी.
१६) जे चांगले आहे ते तुम्ही अंगीकारा आणि कृतीत आणा. जे प्रसिद्ध आणि झगमगाटी आहे त्याच्यामागे धावण्याची गरज नसते.