पुसेसावळी, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील जयराम स्वामींचे वडगाव ते पंढरपूर आषाढी वारी पालखी दिंडीचे प्रस्थान मंगळवार 9 जुलै रोजी होणार असून या सोहळ्यात वारकरी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन दिंडी चालक मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी केले आहे.
जयराम स्वामींचे वडगाव येथून मंगळवारी 9 जुलैला प्रस्थान होऊन म्हासुर्णे येथे मुक्काम,बुधवार 10 जुलैला मायणी येथे मुक्काम,गुरुवार 11 जुलैला विभूतवाडी येथे मुक्काम, शुक्रवार 12 जुलै शेनवडी तालुका माण येथे मुक्काम,शनिवार 13 जुलैला दिघंची येथे मुक्काम,रविवार 14 जुलैला मोहोळ येथे मुक्काम होणार आहे.
दरम्यान,बंडगरवाडी कटफळ येथे जयराम स्वामी पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे.सोमवार 15 जुलैला गादेगाव येथे मुक्काम,16 जुलै मंगळवारी जयराम स्वामी वडगावकर मठ पंढरपूर येथे मुक्काम होणार आहे.
या दिंडी सोहळ्यात वडगाव ग्रामस्थ भजनी मंडळ, शामगाव, वांझोळी, म्हासुर्णे, येडे-उपाळे, कोतीज, अमरापूर, गोरेगाव, पारगाव, कडेपुर, राजाचे कुर्ले, उंबर्डे, विहापूर, मुंबईकर ग्रामस्थ, पोकळेवाडी, हिंगणगाव बुद्रुक,लाडेगाव, डेरवण, उंचीठाणे, अतित, निमसोड, थोरवेवाडी, रेणुशेवाडी, ढाणेवाडी असे सातारा सांगली जिल्ह्यातील भजनी मंडळे उपस्थित राहणार आहेत.
पालखी सोहळ्यानंतर परतीचा प्रवास रविवार 21जुलै भंडी शेगाव, सोमवार 22 जुलै भाळवणी, मंगळवार 23 जुलै पिलीव, बुधवार 24 जुलै म्हसवड, गुरुवार 25 जुलै गोंदवले,शुक्रवार 26 जुलै वडूज, शनिवार 27 जुलै जयराम स्वामींची वडगाव असा राहणार असल्याची माहिती मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी दिली आहे.