वॉशिंग्टन – अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी सांगितले की अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वी कधी नव्हते एवढे आता चांगले आणि घट्ट झाले आहेत. रणनीतीक भागिदारी असलेल्या या दोन्ही देशांच्या संबंधात आता केवळ भक्कमपणा आलेला नाही तर गुणात्मक सुधारणाही झाली आहे.
सोमवारी वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आलेल्या सेलेक्टयूएसए इन्व्हेस्टमेंट समिट निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही टिप्पणी केली. यावेळी भारताचेच सगळ्यांत मोठे प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते. गार्सेटी म्हणाले की भारत आणि अमेरिका यांच्यातील नाते केवळ जोडणारे नाही आणि ते केवळ भारत आणि अमेरिका या दोन देशांपुरतेच प्रकरण आहे असेही नाही.
हे गुणात्मक आहे. युनायटेड स्टेटस टाइम्स इंडिया आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येत भारतीय वंशीयांची संख्या जवळपास १.५ टक्के आहे. ही मंडळी ६ टक्के कर भरतात. अमेरिकेतील हा सगळ्यांत यशस्वी प्रवासी समुदाय आहे. अमेरिकी नागरिकांना आता भारतीय ब्रँड आणि भारतीय कंपन्यांची अधिक चांगल्या प्रकारे माहिती झाली आहे.
दरम्यान, अगदी अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गेलेले अमेरिकेचे संसद सदस्य ग्रेगरी मिक्स यांनी एका मुलाखतीत सांगितले की चीनचा वाढता धोका पाहता भारत हा अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा भागिदार आहे.