IND-W Vs SA-W One-Off Test, Day 3 : – भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका संघाला फॉलोऑन दिल्यानंतर आपल्या दुसऱ्या डावात त्यांनी भक्कम फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 232 अशी आश्वासक स्थिती निर्माण केली आहे. भारताकडून पहिल्या डावात स्नेह राणाने तब्बल 8 फलंदाज बाद केले त्यामुळेच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला.
भारताने आपला पहिला डाव 6 बाद 603 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळेच त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. त्यांचा पहिला डाव अवघ्या 266 धावांवर संपूष्टात आला. त्यांच्याकडून मरीझन केपने 74 तर सुन लुसने 65 धावांची खेळी केली मात्र, त्यांच्या अन्य फलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी झाल्याने भारताने त्यांना फॉलोऑन दिला. या डावात भारताच्या स्नेह राणाने 8 गडी बाद केले.
Stumps on Day 3 in Chennai!
A massive wicket in the final session for #TeamIndia
South Africa move to 232/2.
See you tomorrow for Day 4 action!
Scorecard ▶️ https://t.co/4EU1Kp7wJe#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yhHOSlCAsp
— BCCI Women (@BCCIWomen) June 30, 2024
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात मात्र, सावध खेळ केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांनी 2 बाद 232 अशी आश्वासक मजल मारल होती. या डावात अनेके बोशने निराशा केली. मात्र, त्यानंतर लौरा वोल्हार्टने सुन लुसला साथ देत संघाचा डाव सावरला. लुसने दमदार खेळ करत शतक साकार केले. शतक झाल्यावर मात्र, ती लगेचच बाद झाली. त्यानंतर वोल्हार्टने मरीझन केपसह संघाचा डाव सावरला. खेळ थांबला तेव्हा वोल्हार्ट 93 धावांवर खेळत आहे तर, मरीझन सकेपने नाबाद 15 धावा केल्या आहेत.
T20 World Cup 2024 : विराट-रोहितनंतर आणखी एका खेळाडूने घेतला मोठा निर्णय…
डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना आणखी 105 धावांची गरज आहे. सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी असून भारताला विजयाची मोठी संधी आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावाप्रमाणेच गोलंदाजी केली. मात्र, या डावात दक्षिण आफ्रिकेच्या महिला खेळाडूंनी जबाबदारीने फलंदाजी केली. आता चौथ्या दिवशी 105 धावांची पिछाडी भरुन काढत भारतावर आघाडी घेणार का भारतीय गोलंदाज त्यांचे उर्वरीत 8 फलंदाज बाद करत चौथ्याच दिवशी विजय मिळवणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.