T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Pitch Report) : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी होणार आहे. दोन्ही संघ प्रॉविडेन्स स्टेडियम, गयाना येथे आमनेसामने असतील. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. हा सामना जिंकून टीम इंडियाला इंग्लंडकडून मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघालाही हा सामना जिंकून अंतिम फेरीचे तिकीट मिळवायचे आहे. चला जाणून घेऊया, IND vs ENG सामन्यादरम्यान गयानाच्या खेळपट्टीवर कोणाला सर्वाधिक मदत मिळेल, गोलंदाज की फलंदाजाला?
या मैदानावर सुपर-8 फेरीचा एकही सामना खेळला गेला नाही. पण, लीग टप्प्यातील सामने नक्कीच खेळवले गेले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियममधील खेळपट्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या फिरकी गोलंदाजांना अधिक अनुकूल आहेत. जेथे चेंडू जलद वळण आणि कमी बाऊन्स होतो. याचा अर्थ इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा वरचष्मा असू शकतो. कारण भारताकडे असे गोलंदाज आहेत जे या विकेटचा चांगला वापर करू शकतात.
गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये, फिरकीपटू वेगवान गोलंदाजांपेक्षा किंचित जास्त षटके टाकतात, जी जागतिक प्रवृत्तीपेक्षा वेगळे आहे. गेल्या दोन वर्षांत, गयानामधील फिरकीपटूंनी प्रति षटक सातपेक्षा कमी धावा (6.96) तर वेगवान गोलंदाजांनी प्रति षटक आठपेक्षा जास्त धावा (8.51) दिल्या आहेत. हे भारताच्या तीन फिरकीपटूंना – अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना अनुकूल असावे – तर जोस बटलर मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन तसेच त्याचा प्रमुख गोलंदाज आदिल रशीद या दोघांचाही वापर करू शकतो.
टी-20 विश्वचषकासाठी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियममधील खेळपट्टीचे नूतनीकरण करण्यात आले. पण, साधारणपणे हे मैदान कमी धावसंख्येसाठी आणि फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरले आहे. या टी-20 विश्वचषकातही येथे काही सामने खेळले गेले आहेत, जिथे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व होते. येथे गोलदाजांला कमी बाऊन्ससह टर्न मिळेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.00 वाजता सुरू होईल. मात्र, हवामानाच्या अंदाजानुसार सकाळच्या पावसामुळे उशीर होऊ शकतो. या विश्वचषकात प्रॉव्हिडन्समध्ये फक्त एक सामना दिवसा खेळला गेला, ज्यामध्ये वेस्ट इंडिजला पापुआ न्यू गिनीविरुद्ध 137 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. वेस्ट इंडिजने 5 विकेट गमावल्या होत्या. तेव्हाही विकेट खूपच संथ होती. म्हणजेच या विकेटवर भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटात इंग्लिश फलंदाजांना उखडून टाकण्याची ताकद आहे. मात्र, इंग्लंडकडे मोईन अली आणि आदिल रशीदच्या रूपाने चांगले फिरकी गोलंदाजही आहेत. हे स्पष्ट आहे की जो संघ पॉवर प्लेमध्ये ताकद दाखवेल आणि चेंडू नवा असताना अधिक धावा करेल, त्याची सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मिळवला तीन वेळा विजय
टी-20 विश्वचषक स्पर्धेत गयाना येथील प्रोव्हिडन्स मैदानावर 5 सामने खेळले गेले. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या 146 होती. त्याच वेळी, प्रति षटक सरासरी धावा 6.20 होत्या आणि या 5 सामन्यांपैकी, ज्या संघाने तीन वेळा लक्ष्याचा बचाव करणारा आणि दोनदा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे.
जर आपण जुलै 2021 पासून आतापर्यंतच्या सर्व टी-20 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर एकूण 9 सामने (दोन अनिर्णित सामने वगळता) खेळले गेले. यामध्ये पहिल्या डावाची सरासरी 151 धावा आणि प्रति षटकाची सरासरी धावा 7.18 होती. या कालावधीत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 5 सामने जिंकले आहेत तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत. म्हणजेच नाणेफेकीची भूमिकाही येथे महत्त्वाची असेल.