आळंदी, (वार्ताहर)- श्रीरामकृष्ण आश्रम गेले 25 वर्षांपासून समाजामध्ये गरीब गरजू मुलांसाठी काम करत आहे. आजपर्यंत या संस्थेने हजारो विद्यार्थी घडवले आहेत व संपूर्ण महाराष्ट्रमध्ये समाज प्रबोधनाचे कार्य या तरुण मुलांकडून अहोरात्र सुरू आहे.
समाजामध्ये बरेचशे पालक परिस्थितीमुळे मुलांना सांभाळण्यास असमर्थ आहेत अशा मुलांसाठी मरकळ येथे नवीन शाखेचे उद्घाटन हभप प्रकाश महाराज जवंजाळ, विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने भव्य दिंडी मिरवणूक काढून मरकळ मधील मारुती मंदिर व गणेश मंदिराला प्रदक्षिणा करून प्रकाश महाराज जवंजाळ यांचे कीर्तन प्रारंभ झाला. संस्थेकडे स्वतःची स्कूलबस आहे मुलांसाठी झोपण्यास बेड आहेत.
पिण्याला फिल्टरचा पाणी प्रत्येक आठवड्याला मिठाई दिले जाते. विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देणारी संस्था आहे. या आश्रमामुळे पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब गरजू कष्टकरी शेतकरी व अनाथ मुलांना शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षण व निवास सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराजांनी कीर्तनामधून अनेक दाखले दिले.
येथे 30 अनाथ मुले असून काही मुलांना तर आई-वडील, आजी आजोबा कोणीही नाही अशा मुलांचे संस्था संगोपन करीत आहे. त्याबद्दल महाराजांनी ताई माऊली महाराज व मोहन महाराज शिंदे यांचे कौतुक केले. ख्यातनाम गायिका राधिका जोशी व अविनाश पाटील यांच्या भजनाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला नरहरी महाराज चौधरी, विलास तात्या बालवडकर,
आबा महाराज गोडसे, माऊली महाराज करंजीकर, दिनकर धारपाळे, बाळासाहेब फणसे, तानाजी शिंदे, साधू शिंदे, प्रभाकर शिंदे, मृदुंगमणी कल्याणी शिंदे, ज्ञानेश्वरी शिंदे, रोहिदास कदम, प्रकाश वाडेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, आळंदी शहरप्रमुख अविनाश राळे, रामचंद्र सारंग, कृष्णा कोलते, तुकाराम वहिले, मरकळ ग्रामस्थ, पंचलिंग देवस्थानचे भक्तगण उपस्थित होते.