Mamata Banerjee| लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यातील पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. यातच काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची युती नसल्याचे सांगत ‘एकला चलो रे’ चा नारा दिला होता. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? Mamata Banerjee|
इंडिया आघाडीला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याची भूमिका ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “या लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असेल आणि इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात स्थापन होणार असेल तर तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे. आम्ही केंद्रात सत्ता स्थापन केल्यास पश्चिम बंगालच्या माता भगिनींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही,” असे मतही यावेळी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीत काँग्रेससोबतच्या जागावाटपावर असहमती दर्शवली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, ‘इंडिया आघाडीच्या स्थापनेत मी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विरोधी पक्षांच्या युतीचं नावंही मीच दिलेलं होतं. पण पश्चिम बंगालमध्ये सीपीआय (एम) आणि काँग्रेस भाजपसाठी काम करत आहेत.” Mamata Banerjee|
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. या इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका लढवल्या जात आहेत. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिलेला आहे. त्यांनी कोणत्याही पक्षांबरोबर आघाडी केली नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत आता ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
हेही वाचा: