Chandrakant Patil On Rohini Khadse| राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. एकीकडे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून शुल्क भरून मुली प्रवेश घेत आहेत. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यातच शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवणार असल्याचे म्हंटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले की, “मी कोल्हापूरचा असून मला बदामाची गरज नाही. रोहिणी खडसे कदाचित मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलत असतील. त्यांचं आणि माझं नाव सारखं असल्याने त्यांचा नेहमी गोंधळ होतो. त्यामुळे त्यांना कदाचित त्या चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवायच्या असतील, मला बदामाची आवश्यकता नाही, कारण मी कोल्हापूरचा आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे?
रोहिणी खडसे ट्वीट करत म्हंटले होते की, “चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुलींच्या मोफत शिक्षणाचा, फी माफीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थिनींना प्रवेशासाठी भरमसाठ फि भरावी लागत आहे. तरी चंद्रकांत दादा पाटील यांना आपल्या घोषणेची आठवण करून देऊन शासनाला विद्यार्थिनींची फि माफीचा शासन आदेश निर्गमित करण्यासाठी आपल्याला भाग पाडायचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या भगिनींना चंद्रकांत पाटील यांना एक स्मरणपत्र व स्मरण शक्ती तल्लख होण्यासाठी सोबत एक बदाम पोस्टाने त्यांच्या मंत्रालय येथील कार्यालयाच्या पत्यावर पाठवायचे आहेत,” असे म्हंटले. Chandrakant Patil On Rohini Khadse|
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसावेळी म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. त्या वेळी पाटील यांनी १ जूनपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचेही म्हटले होते. मात्र, जून महिना संपत आला, तरीही राज्य सरकारचा शासन निर्णय निघाला नाही किंवा अंमलबजावणीही झाली नाही.
त्यावर आचारसंहिता लागू असल्याने मोफत मुलींच्या शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला नाही. लोकसभेनंतर आता विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने ह्या निवडणुका संपल्यानंतर कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले होते. Chandrakant Patil On Rohini Khadse|
हेही वाचा: