नगर, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, शेंडी, डोंगरगण, मांजरसुंबा, जेऊर, इमांमपुर, निंबळक, आगडगाव, परिसरात पावसाने दांडी मारल्याने शेतकरीर्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून दमदार पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे.
शेतकर्यांनी शेतातील नांगरटी, रोटावेवेटर आदीसह शेतीच्या मशागतीची कामे करीत अनेकांनी पेरणी केली. मुग, बाजरी, सोयाबीन, उडीत, कपाशी तसेच जनावरांसाठी मका, कडवळाची पेरणी केली. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने हुलककवणी दिल्याने शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. आता तरी दमदार पाऊस होइल अशी आशा शेतकर्यांना आहे.
ततसेच काही शेतकर्यांनी सोयीनुसार बी- बियाणे खरेदी करून खतांची साठवणूक केली आहे. तर काहींनी मागील झालेल्या पावसाच्या वापश्यावर पेरणी केली. मात्र, त्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.