– डॉ. जयदेवी पवार
आखाती देशात शोषणाचे प्रमाण अधिक असताना आणि राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसतानाही भारतीय नागरिक या देशांत का जातात? याचे कारण या देशात होणारी अधिक कमाई.
नव्वदीच्या दशकात कादर खान आणि शक्ती कपूर यांचा ‘बाप नंबरी, बेटा दस नंबरी’ नावाचा चित्रपट झळकला होता. या चित्रपटांत आखातात नेणार्या एजंटकडून मजुरांची कशी ङ्गसवणूक होते, याचे एक दृश्य होते. या दृश्यात असरानी हे दुबईतून नोकरीच्या पैशातून सोन्याचा झाडू विकत आणल्याचे सांगतात. ते पाहून मजूर हुरळून जातात. प्रत्यक्षात या त्रिकुटांची मिलिभगत असते आणि पैसे उकळून मजुरांना दुबईच्या नावाखाली मुंबईच्या दुसर्या टोकाला सोडतात. अशी ङ्गसगत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असतानाही भारतीय कामगारांचे आखाताचे आकर्षण अजूनही कमी झालेले नाही. मात्र कुवेतच्या घटनेने भारतीय मजुरांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे.
कुवेतच्या दक्षिण मंगाङ्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका इमारतीत भीषण आग लागली आणि त्यात 49 कामगारांचा मृत्यू झाला. यात 41 भारतीय नागरिकांचा समावेश होता. या इमारतीत 190 जण राहत होते आणि त्यातील बहुतांश जण गुदमरून गेले. होरपळून निघालेले मृतदेह ओळखता येत नव्हते. या घटनेनंतर कुवेतमध्ये रिअल इस्टेट मालक आणि कंपनी मालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ही मंडळी पैसे वाचविण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करतात आणि मोठ्या संख्येने परदेशातून आणलेल्या मजुरांना अतिशय असुरक्षित जागेत ठेवतात. त्यामुळे कुवेत सरकारकडून कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच काही ठिकाणी जीर्ण झालेल्या इमारतीत राहणार्या स्थलांतरित मजुरांना बाहेर काढण्यात आले मात्र त्यांना आता उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. यात राजस्थानी कारागिरांची संख्या अधिक आहे. मजुरांनी स्वप्नात बाळगलेला सोन्याचा झाडू कोठे गेला? भरभक्कम पगार आणि परदेशात कमावण्याचे सुख याचा थांगपत्ताही दिसत नाही.
कुवेतमध्ये भारतीय कामगारांना बरीच मागणी असते आणि वेतनाच्या आमिषापोटी दरवर्षी बरेच कामगार कुवेतला जातात. कुवेतमध्ये भारतीयांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा अधिक आहे आणि ती एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के आहे. कुवेतने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कुवेतची लोकसंख्या 48 लाख 59 हजार असून त्यात 15 लाखांपेक्षा अधिक स्थानिक नागरिक आणि 30 लाखांपेक्षा अधिक स्थलांतरित कामगार आहेत. कुवेतमध्ये राहणार्या भारतीय नागरिकांत सुतारकाम करणारे, विटबांधकाम करणारे मिस्त्री, घरात काम करणारे मजूर, चालक आणि डिलिव्हरी बॉय यांचा समावेश असतो. अनेक लोक भारतापेक्षा अधिक पैसे मिळतात, या उद्देशाने कुवेतकडे धाव घेतात. परंतु त्यांना अतिशय दयनीय स्थितीत राहावे लागते.
भारतीय कामगारांचे शोषण केले जात असल्याचा कुवेत सरकार आणि स्थानिक श्रीमंतांवर आरोप केला जातो. भारतीय कामगारांना ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम करून घेतले जाते. पैसे कमी देण्याबरोबरच काहीवेळा त्यांचे पगारही थांबविले जातात. शोषणाचे प्रमाण एवढे वाढले की शेवटी भारतीय दूतावासाला वेगळा मदत कक्ष स्थापन करावा लागला. कुवेतच्या अनेक शहरात अनेक इमारती निवासी वस्तीपासून दूरवर आहेत. या ठिकाणी परदेशातून आलेल्या मजुरांना ठेवले जाते. एका एका खोलीत मजुरांची संख्या गरजेपेक्षा अधिक असते. हे कामगार अधिक पैसा खर्च करण्यास किंवा चांगले राहणीमानाच्या स्थितीत नसतात आणि त्याचा गैरङ्गायदा घेत मजुरांना नरकयातना देण्याचे काम केले जाते आणि मजूरही निमूटपणे सहन करतात.
मालकांकडून मजुरांचे शोषण
कुवेतला जाणार्या मजुरांत बहुतांश तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड सारख्या राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. कुवेतला जाणार्या मजुरांचा अनुभव वाईट असला तरी आर्थिक स्थितीमुळे कुवेतला जाणार्या मजुरांच्या संख्येत घट झालेली दिसत नाही. अलीकडेच एका अहवालानुसार, मजुरांची जीवनशैली अतिशय दयनीय असताना त्यांना मालकांच्या गैरवर्तनाचा देखील सामना करावा लागतो. मालकाकडून त्यांचे प्रचंड शोषण केले जाते आणि अनेक महिने तर त्यांना वेतनच दिले जात नाही. कोदंट आणि अस्वच्छ ठिकाणी राहण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते. मालकांकडून सतत धमकावले देखील जाते. या मजुरांना घेऊन जाणारी कंपनी पासपोर्ट जप्त करतात आणि त्यानंतर त्यांचे हाल सुरू होतात.
अधिक कमाईमुळे ओढा
आखाती देशात शोषणाचे प्रमाण अधिक असताना आणि राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसतानाही भारतीय नागरिक कुवेत आणि अन्य आखाती देशांत कशासाठी जातात? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. याचे सोपे उत्तर म्हणजे त्यांच्या डोक्यात असते आखाती देशात होणारी अधिक कमाई. त्यांना भारतापेक्षा अधिक पैसे मिळत असल्याने आखाती देशाचे आकर्षण अधिक असते आणि या आकर्षणापोटी ते वाईट अनुभवाचा सामना करत नोकरी करतात. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशन रेगुलेशनच्या नियमानुसार परदेशात काम करणार्या भारतीय मजुरांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. अर्थात या गोष्टी कागदोपत्रीच दिसतात. कारण बहुतांश प्रकरणात किमान वेतनाचे आणि अन्य नियमांचे पालन होत नाही.
दहा लाखांचा विमा कवच
कुवेतने मिस्त्री, चालक, प्लंबर, सुतारकाम करणारे कारागीर यांना सुमारे तीनशे डॉलर किमान वेतन निश्चित केले आहे. अवजड वाहन चालवणारे आणि घरी काम करणार्यांची स्थिती थोडी चांगली आहे. त्यामुळे त्यांना वेतनही अधिक मिळते. भारतीय सरकारने भारतीय कामगारांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कामगारांचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दहा लाखांचा विमा कवच देण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यास त्याचा खर्च देखील सरकारकडून केला जातो.
नियमांचे पालन नाही
भारतीय दूतावासाच्या संकेतस्थळानुसार, 1990-91 आखाती युद्धाचा भारतीय कामगारांवर मोठा परिणाम झाला. या युद्धामुळे सुमारे 1.7 लाख भारतीय मायदेशी परतले. पण अलीकडच्या काळात कुवेतला जाणार्या लोकांची संख्या वाढली आहे. कुवेतमध्ये भारतीय नागरिकांची होणारी ङ्गसवणूक आणि शोषण पाहता भारतीय दूतावासांकडून वेळोवेळी दिशानिर्देश जारी केले जातात. मात्र त्याचा ङ्गारसा ङ्गायदा होत नाही.