आळंदी, (वार्ताहर) – देहू, आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्यांसाठी आता वारकरी देहू, आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे शनिवारी (दि. 29) प्रस्थान होणार आहे.
प्रस्थानानंतर पहिला मुक्काम आळंदी येथे असणार आहे. रविवारी (दि. 30) सकाळी सहा वाजता पालखी पंढरपूरच्या दिशेने पुणे मुक्कामासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी (दि. 28) देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.
तुकोबारायांच्या पालखीसोबत जाण्यासाठी आलेले वारकरीही आळंदीला येऊन माऊलींचे दर्शन घेतात. त्यामुळे आळंदीत आता भाविक वारकर्यांचे आगमन होत आहे. आळंदीतील धर्मशाळा, वारकरी आश्रम तसेच धार्मिक ठिकाणे वारकर्यांनी गजबजायला सुरुवात झाली आहे.